पालावरची शाळा

भटके विमुक्त समाज गावकुसाबाहेर पाले टाकून राहतो. या भागात शासनाच्या शाळा असतात पण या समाजातील मुलांना त्यांच्या राहणीमानामुळे , अस्वच्छता, भाषेत असलेली तफावत, जगण्यासाठी मागावी लागणारी भिक्षा अशा अनेक कारणाने त्यांचे शाळेशी समायोजन होवू शकले नाही. त्यामुळे पुर्व प्राथमिक शिक्षणाशी ते जोडले न गेल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात पुढील अनेक वर्षे ते येण्याची कुठलेही चिन्ह नाहीत.


भटके विमुक्तातील अनेक समाज जसे डोंबारी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, मसनजोगी, बहुरूपी या समाजात कुटुंबाचा प्रमुख आधार मुलेच असतात. कुटुंबाला जगविण्यासाठी भिक्षा मागून, कसरती करून, भविष्य सांगून, अभिनय करून, कुटुंबाचे पालनपोषण करतात. यामुळे नियमित शाळेची वेळ, शाळेची शिस्त, शाळेचा दिलेला अभ्यासक्रम पाळणे अतिशय कठीण बाब आहे. यामुळे भटके विमुक्त समाजात शाळाबाहय मुलांची संख्या अधिक दिसून येते.


भटके विमुक्त समाजातील मुले पुर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ते राहत असलेल्या ठिकाणी म्हणजे पालावरती शाळापुर्व शिक्षण व पुर्व प्राथमिक शिक्षण मिळण्याची योजना करण्यात आली. यालाच “पालावरची शाळा / अभ्यासिका” म्हणतात. त्यांची भाषा, जिवनव्यवहार, त्यांचे निसर्गज्ञान, कलाज्ञान, त्यांचा परिसर यांची प्रचलित अभ्यासक्रमाला जोड देवून अनौपचारिकरित्या तसेच अतिशय लवचिक व परिवर्तनशिल अभ्यासक्रम असलेली शाळा / अभ्यासिका चालविली जाते. पालावरती शिक्षकाला वेळोवेळी येणारे अनुभव या आधारे अभ्यासक्रम विकसित होत जावून या वस्तीतील मुलांचे प्रचलित शिक्षण व्यवस्थेतील शाळेत जाण्याची क्षमता तयार करण्यासाठी पालावरच्या शाळा/अभ्यासिकेची आवश्यकता आहे.

पालावरची शाळा / अभ्यासिका म्हणजे काय ?

पालावरची शाळा / अभ्यासिकाही भटके विमुक्त समाजाच्या मुलांच्या सोयीनुसार भरणारी आहे. या शाळा / अभ्यासिकेला विशिष्ट जागा नाही, गणवेश नाही, स्थिर जागा नाही, अभ्यासक्रम नाही, अगदी परीक्षासुध्दा नाही. प्रमाणशाळेच्या वेळा सोडून मुलांच्या सोयीने त्यांची शाळा / अभ्यासिका घेतली जाते. ही शाळा / अभ्यासिका दोन ते तीन तास असते. त्यांची भाषा येणाऱ्या व्यक्तिला शिक्षक / शिक्षीका म्हणून नेमले जाते. 95 टक्के महिलाच या शाळा / अभ्यासिकेवर शिक्षक म्हणून काम बघतात. मुलांच्या बोली भाषेप्रमाणे, खानपानाच्या सवयीप्रमाणे स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला जातो. चार ते 14 वयोगटातील मुले ही या शाळेचा भाग आहेत. पालावरच्या लोकांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगत या शाळेत मुलांना पाठवण्यासाठी संबंधीत शिक्षक प्रयत्न करत असतात

  • अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून प्रचलित शिक्षण व्यवस्थेत 4 ते 14 वयोगटातील मुलांना जोडणे.
  • आनंददायी व अनौपचारिक शिक्षणाची प्रक्रिया गतिमान करणारे शिक्षण देणे.
  • विदयार्थ्यांचा परिसर, त्यांची भाषा, त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल, त्यांचे विज्ञान, त्यांचे समाजज्ञान समजून घेवून विदयार्थ्यांना विकसित करणे.
  • चार भिंतीच्या शाळेपेक्षा त्यांचे परिसर, त्यांची जीवनशैली व जीवन व्यवहाराशी मिळते जुळते शिक्षण देणे.
  • आरोग्य आणि स्वच्छता याचे महत्व समजून देवून विदयार्थ्यांना वर्तमानाशी जोडण्याचे शिक्षण देणे.
  • भटका समाज व सामान्य समाज यामधील अंतर कमी करण्यासाठी निरनिराळे शैक्षणिक अनुभव देणे.
  • 1200 विदयार्थ्यांना प्रमाण शाळेत भरती करण्यात आले.
  • संस्थेच्या माध्यमातून आधारकार्ड, मतदानकार्ड, राशनकार्ड, पॅनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र काढण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत...
  • पाच वस्त्यांवर 154 कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म भरण्यात आले आहे...
  • सहा वस्त्यावर 42 शौचालय बांधण्यात आले आहेत.
  • messagess.point_11
  • शाळेचे वार्षिक उत्सव वस्तीच्या मदतीने साजरे करण्यात येतात.
पालावरची शाळा ही वस्ती विकासाची चळवळ व्हावी यासाठी पुढील बिंदू निश्चित करण्यात आले.

पालावरची शाळा / अभ्यासिका संक्षिप्त अहवाल
अ.क्र. प्रांत शाळा संख्या समाज जिल्हे मुलांची संख्या
1 देवगिरी 22 15 4 689
2 पश्चीम महाराष्ट्र 29 11 4 840
3 कोकण 12 8 4 421
एकूण 63 25 12 1950

भटके विमुक्त समाजातील विशेष करून मुलांच्या आरोग्य समस्या दुर करण्यासाठी आरोग्य आयामाची सुरवात करण्यात आली. याच्या अंतर्गत मुलांना पोषण आहार, लसीकरण तसेच वस्तीला डॉक्टर जोडणे, आरोग्य शिबीर, आरोग्य मार्गदर्शन असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचबरोबर वस्ती स्वास्थ्य नीट रहावे म्हणून 14 ठिकाणी आरोग्य पेटीचेही वाटप करण्यात आले आहे.
अ.क्र. प्रांत जोडलेले डॉक्टर आरोग्य शिबीर संख्या दरमहा लाभार्थी लसीकरण
1 देवगिरी 22 20 698 वर्षातून 4 वेळा
2 पश्चीम महाराष्ट्र 3 4 200 वर्षातून 2 वेळा
3 कोकण 2 4 150 वर्षातून 2 वेळा
आरोग्य विभाग विशेष
  • 28 ठिकाणी महिला आरोग्य जनजागृती बैठका आयोजित करण्यात आल्या.
  • 14 वस्त्यांवर आरोग्यपेटी वाटप झाले.
  • जोडलेल्या सर्व डॉक्टरांचे रक्षाबंधननिमित्त राखी बांधून त्यांचे धन्यवाद मानण्यात आले.
  • करोनाची भिती घालवण्यासाठी समाजातील लोकांचे मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर साबण आणि मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
  • तसेच वस्त्यांवरती हात धुण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

या आयामाअंतर्गत वस्तीतल्या लोकांना एकत्रित आणण्याचे कार्यक्रम घेण्यात येतात. मुख्य उददेश वस्तीतल्या लोकांचे संघटन वाढवणे असून त्या अंतर्गत वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात.
  • वस्तीमध्ये योगदिन, स्वातंत्र्यदिन, गणेशउत्सव, मकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन साजरे केले जातात. यात जास्तीतजास्त पालकांचा सहभाग घेतला जातो.
  • वस्तीमध्ये विविध नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरी केली जातात.
  • वस्तीमध्ये पालकांचा सहभाग घेवून वस्तीस्वच्छता अभियान राबविले जाते.

वस्ती विकासासाठी या आयामाअंतर्गत भटक्या विमुक्त समाजाच्या महिलांचे बचतगट तयार करण्यात आले. महिलांना सबलीकरण करणे व आर्थिक बचत करणे हे या प्रकल्पाचे उददेश. एकूण 44 बचत गट कार्यरत आहेत त्यात 3 पुरूष बचत गट आहेत.
एकूण बचत गट :
44
एकूण बचत रक्कम :
1035300
महिला संघटन :
393
पुरूष संघटन :
42
खेळते भांडवल मिळालेले :
5 बचत गट
विमा उतरवलेले गट :
5
एकूण बचत गट सदस्य :
435
  • बचत गटातील महिलांची बैठक घेवून त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
  • बचत गटातील महिलांना साक्षर करायचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
  • महिलांना विविध उदयोग प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात महिला पायपुसणी बनवणे, टेलरींग शिकत आहेत
  • विविध बचतगट मेळाव्यांत त्यांना अनुभव घेण्यासाठी सम्मीलीत करण्यात येते.